आरमोरी : भरधाव ट्रकने विद्यार्थिनीस चिरडले

1349

– भावासाठी राखी घ्यायला जातांना अपघात
The गडविश्व
आरमोरी,५ ऑगस्ट : भावासाठी राखी घेण्यास निघालेल्या विद्यार्थिनीस आरमोरी येथील बर्डी परिसरात भरधाव ट्रकने चिडल्याची धक्कादायक घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
प्रांजली निलेश भानारकर (१७) रा.मोहझरी ता.आरमोरी असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रांजली आरमोरी येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती असून ती मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात राहत होती. दरम्यान दुपारी ३ वाजताच्या सुमारास वसतीगृहातून सुट्टी मागून मैत्रीण दीपाली बारकर हिच्यासोबत सायकलने राखी घेण्यास जात असतांना देसाईगंज मार्गे आरमोरी येथे येणाऱ्या एमएच २० सीटी ४०४१ क्रमांकाच्या बराचाकी ट्रकने प्रांजलीला जबर धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला.
आरमोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून ट्रक ताब्यात घेतला आहे ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला असून त्याचा शोध घेणे सुरू आहे . अधिक तपास आरमोरी पोलीस करीत आहे.
दरम्यान या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. भरधाव वाहनाने अनेक अपघात सुद्धा झाले आहे. असे असतांनाही प्रशासनामार्फत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेने भानारकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here