पाऊस आणि चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या त्या नागरिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

320

– माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात ७ जुन रोजी आलेल्या जोरदार पाऊस आणि चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक गावातील काही घरांवर झाडे पडून तर काहिंच्या घराचे छत उडुन गेले. यात जीवित हाणी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन जनजीवन विस्कळीत झाले, काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. सदर बाब लक्षात घेऊन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी पाऊस आणि चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या त्या नागरिकांचा तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
७ जून रोजी अचानक वादळ वरा, वा पावसाचे आगमन झाले यात अनेकांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी भ्रमनद्वानी द्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तात्काळ त्या नुकसानग्रस्त भागातील जाऊन पाहणी करून आणि पंचनामे करून त्या त्या नुकसानग्रस्थ नागरिकांचा नुकसानभरपाई देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
‘जिल्ह्यातील या वर्षी पावसाळ्यात भर पाऊस पडण्याची शकत आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची शकत आहे. सुरवातीलाच चामोर्शी तालुक्यात कुनघाडा आणि तळोधी मोकासा परिसरात काल विजांच्या कडकटासह थोडी गारपीटही झाली. यावेळी वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून जिल्ह्यातील नागरिकांनी या पावसाडयामधे सतर्क राहण्याचे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here