आष्टी ते आलापली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई द्या

1008

– जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, ११ नोव्हेंबर : आष्टी ते आलापली राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३ या तलाठी कार्यालय साजा क्र.९ मधील बोरी, राजपूर प्याच, शिवनीपाठ या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत आहेत मात्र गेल्या वर्षापासून सूरजागड येथील लोहखनिज उत्खनन करून दररोज हजारो ट्रक ये-जा करत असल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीवर पूर्णतः धूळ पसरत असल्याने शेतातील उभे पिक कापूस, धान पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याकडे निवेदनातून केली.
यावेळी गावातील प्रतिष्ठीत व शेतकरी शंकर कोडापे सरपंच बोरी, सौ.मीनाताई वेलादी सरपंच राजपूर प्याच, सुरेश गंगाधरीवार माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य, सुरेश आदे,गोपाळ आदे,चंदु मौहूर्ले, बळवंत आदे, नागेश मोहूर्ले,मीना कावळे, रुपेश चांदेकर, सतीश दैदावार, विलास निकेसर, नागेश वेलादी, शंकर पम्पेलवार, शायलू मडावी सरपंच खमनचेरु, प्रभाकर मडावी, मारोती मडावी, नितीन गुंडावार, अजय मडावी, शोभा मडावी, मधुकर वेलादी, शंकर कम्पेलवार, रुपेश चांदेकर,शंकर निकेसार, बापू ठाकरे, रामुलु कुळमेथे, मधुकर वेलादी, जितेंद्र शेंडे, सुरेश आदे, सुरेश निकेसर, नागेश मोहूर्ले, रामभाऊ आदे, गोपाळा आदे, पेंटू अलोने सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार या इ काल दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज पासून शेतीच्या पंचनामेला सुरुवात झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई सुद्धा मिळणार असल्याने माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here