साहेब… मुख्य चौकातून सुसाट चालणाऱ्या जड वाहनांवर ब्रेक लागणार काय ?

449

– मुख्य चौकातून जड वाहने सुसाट, वेग मर्यादेचे होत आहे उल्लंघन
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी हा मुख्य चौक वर्दळीचे ठिकाण आहे. दिवसभर येथे वाहनांची, पादचाऱ्यांची वर्दळ असते यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडीही निर्माण होते. मात्र शहरात व शहराच्या बाहेर अनेक विकास कामे सुरू असल्याने तसेच इतर राज्यात वाहतूक करणारे ट्रक तसेच इतर जड वाहने हे वेगमर्यादेपक्षा अधिक गतीने इंदिरा गांधी चौकातून सुसाट चालतांना दिसत आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे वाहतूक पोलिसांनी या सुसाट चालणाऱ्या वाहनांवर ब्रेक लावणे आवश्यक आहे.
शहरात एकच इंदिरा गांधी मुख्य चौक असल्याने या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. सकाळी तसेच संध्याकाळच्या सुमारास चौक परिसरात वाहनांची वर्दळ, नागरिकांची गर्दी पहावयास मिळते. मात्र मुख्य एकच चौक असल्याने सर्व वाहने या चौकातून जात असतात. मात्र वाहनांचा वेग हा वेगमर्यादेपेक्षा अधिक राहत असल्याने अनुचित घटना, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, शहरात तसेच शहराच्या बाहेर व राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक जड वाहने मार्गक्रमन करीत असतात मात्र चौक हा वर्दळीचा ठिकाण असतांना सुद्धा जड वाहने सुसाट चालतांना दिसत असतात. अनेकदा यापूर्वी जड वाहनांमुळे चौक परिसरात अपघात सुद्धा झाले आहे. त्यामुळे मुख्य चौकात वाहतूक पोलिसांची चौकी असल्याने वाहतूक पोलिसांनी सुसाट चालणाऱ्या जड वाहनांच्या गतीवर ब्रेक लावणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here