सात दिवसात आलापली ते आष्टी मार्गाची तात्काळ दूरूस्ती करा : जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार

989

– अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
The गडविश्व
अहेरी, २१ ऑगस्ट : एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सूरजागड लोहप्रकल्पाला जनतेचा विरोध असताना सुद्धा सुरू करण्यात आले असून सूरजागड येथून दररोज लोह दगड वाहतूक केले जाते. दरदिवशी मोठमोठ्या लोहदगळ वाहतूक केले जात असल्यामुळे आलापल्ली ते आष्टी महामार्गाची दुरवस्था झाली असून सदर मार्गाची सात दिवसाच्या आत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरीचे तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सुद्धा इशारा देण्यात आला आहे .
आष्टी -आलापल्ली मार्गावर जडवाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने मोटर सायकल, वाहन चालकाना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तसेच कमालीचा त्रास सहन करवा लागत आहे. बाहेर गावावरून आलापल्ली, आष्टी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना शाळेत वेळेवर पोहचता येत नसून जिव मुठीत धरून शिक्षणासाठी बाहेर पडावे लागत आहे व एखादी आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यास अडचण निर्माण झाले असून असे कित्येक घटना पहावयास मिळत आहेत. तरी सदर समस्यांवर त्वरीत लक्ष घालून सदर मार्ग सात दिवसात दुरुस्त करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केला आहे.
निवेदन देतांना बोरीचे सरपंच शंकर कोडापे, राजपुर प्याच च्या सरपंचा वेलादी , नितीन गुंडावार, खमनचेरुचे सरपंच शायलू मडावी, महागाव, लगाम ग्राम पंचायतीचे सरपंच, सुरेश गंगादरीवार, सोयल पठाण, पांडुरंग रामटेके, रावी नेलकूद्री, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी तसेच सर्व ग्रा.प.सरपंच उपसरपंच सदस्य गण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here