शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वी आणि १२ वीच्या निकालाबाबत दिली महत्त्वाची माहिती

9432

The गडविश्व
शिर्डी : राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचचे लक्ष आता निकालाकडे लागून राहिले आहे. निकालाचे दिवस जसजसे जवळ येत आहेत तसतशी विद्यार्थ्यांची धाकधूक वाढत आहे. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात तर १५ दिवसांनी म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्या शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here