धानोरा : तीन वर्षांपासून शेतकरी लाभार्थीचे गुरांच्या गोठयांचे अंतिम बिल प्रलंबित

233

– नेमके पाणी मुरले कुठे ?
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० मे : पंचायत समिती धानोरा अंतर्गत तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०१९-२०२० ते २०२०-२१ मधे गुरांच्या गोठयांचे बांधकाम पुर्ण करुन सदर शेकडो शेतकरी लाभार्थी मागिल तिन वर्षापासून बांधकाम पूर्ण होऊनही अंतिम बिल न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांवरती उपासमारीची पाळी असल्याने सदर रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी लाभार्थ्यांनी केली आहे.
धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजगीचे माती, बोळीचे माती काम करण्यात येते. त्याच प्रमाणे धानोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०१९-२०, २०२०-२१ गुरांच्या गोठ्याचे बांधकाम करण्यात आले. गुरांच्या गोठ्याचे अंदाजपत्रक एकाच गावातील लाभार्थी अंदाजपत्रक रक्कम वेगळी आहे. त्यात ९४४३१,१००७४५,९५१३४,१००६५३, ८८६४३ अशी रक्कम वेगळी त्यापैकी लाभार्थ्यांना ६७४४४, ७६४२७, ७६४२९,६८२४२,६६६१८ रक्कम प्राप्त झाली खरी पण उर्वरित रक्कम आजतागायत प्राप्त झालेली नाही. काही लाभार्थीचे अर्धकुशल कामाचे बिलच रोजगार सेवकांनी सादर केलेले नाही. त्यामुळे पाणी मुरते कुठे हेच लाभार्थ्यांना कळलेले नाही. सदर योजनेत निमणवाडा, सालेभट्टी, चिचोली, फुलबोडी, गिरोला, खंबाळा, लेखा, मोहली, नवरगाव, रांगी, बोरी, कन्नळगाव, मासरगाटा, चिंगली, गिरोला, मिचगाव, फुलबोडी, फिरंगे,जांभळी कुलभट्टी अशा अनेक गावांमध्ये गुरांच्या गोठयांचे बांधकाम करण्यात आले.
ज्या शेतकऱ्यांचे जनावरे आहेत. त्याच शेतकऱ्यांच्या जनावरांना राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील शेकडो शेतकरी लाभार्थ्यांनी गुरांच्या गोठयांचा लाभ घेतला. लाभ देत असताना प्रत्येक गावाचे इस्टिमेट वेगवेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आले आणि त्याची किंमतही वेगवेगळी तयार करण्यात आली त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांचे काही बिल काढण्यात आले आणि शेवटचे अंतिम बिल संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे अंतिम बिल जैसे थे ठेवण्यात आलेले आहे. मात्र यावर कोणीच बोलायला तयार नाहीत. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असून सदर रक्कम गेली कुठे असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
प्रत्येक गावातील लाभार्थीचे इस्टिमेट वेगवेगळे कसे ठरविण्यात आले. गुरांच्या गोठयाचे बांधकाम सारखे, त्याची लांबी रुंदी सगळे सारखेच, सामान, मिस्त्री सारखेच असताना एस्टिमेटचे रक्कम वेगळी कशी असा प्रश्न शेतकरी लाभार्थी विचारत आहेत. बांधकामानंतर तिन वर्षे उलटूनही अजून पर्यंत पैसे मिळालेले नसल्याने शेकडो शेतकरी आजही शासनाकडे कडून असलेले शेवटचे बिल कधी मिळणार याच प्रतीक्षेत असून शासन पैसा उपलब्ध करून देणार की नाही याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी स्वतः बांधकाम करताना रक्कम खर्च केली खरी पण आता मिळणार की नाही याच विवंचनेत आहेत. ज्या लाभार्थ्यांनी पैसे दिले त्याची अंदाजपत्रक प्रमाणे संपूर्ण रक्कम काढण्यात आली. सदर गुरांच्या गोठ्याचे फलक शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून खर्च केले तरीही त्यांची रक्कम कपात करण्यात आली आहे. ज्या लोकांना जनावरे नाहीत अशा शेतकऱ्यांनी यांचा लाभ घेतला आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर कडुन खोटे प्रमाणपत्र घेऊन शासनाच्या गुरांच्या गोठ्याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे खोटे प्रमाणपत्र जोडून लाभ घेणारी लाभार्थ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि
रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या गुरांच्या गोठयांच्या बांधकामाचे शिल्लक पैसे त्वरित देण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी लाभार्थ्यांनी केली आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, dhanora, )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here