बोर्डावरच रस्ता दुरुस्ती, रस्ते मात्र खड्डेमय : जिबगांव-साखरी-सावली मार्गाची दुरावस्था

556

– प्रशासन मात्र झोपेत
The गडविश्व
ता.प्र/ सावली : तालुक्यातील जिबगांव, हरांबा ,लोंढोली,साखरी मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडलेले आहे. बोर्डावरच रस्ता दुरुस्ती रस्ते मात्र खड्डेमय अशी म्हणायची वेळ आली आहे. या मार्गावरील मोठे खड्डे धोकादायक ठरत आहेत. यामुळे या मार्गावरून जाताना अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.पावसाळा तोंडावर असतांना सुद्धाही या रस्त्याची साधी डागडुजी पण दिसत नाही. मागील अनेक वर्षांपासून तात्पुरता मुरूम टाकून लोकांना समाधान केल्या जाते. पाऊस पडल्यानंतर मुरूम निघून गेल्याने या मार्गाला अपघात होत असतात. समोरून वाहन आल्यास त्यांना साईड देतो म्हटले की खड्यात गाडी गेलीच समजावी, इतकी खराब परिस्थिती या मार्गाची झाली असतांनाही प्रशासन मात्र झोपेतच असल्याचे चित्र दिसत आहे.
सावली येथे तहसील कार्यालय, पंचायत समीती, बँका, शाळा, महाविद्यालये, पत संस्था, पशु वैद्यकीय दवाखाना, बाजारपेठ अन्य शासकीय कार्यालये असल्याने जिबगांव, उसेगांव, सिर्सी, साखरी, लोढोली, हरांबा, उपरी, कापसी, आदी या गावातील लोकांची सावलीला दररोज ये-जा असते. तसेच रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनाची रेलचेल सुरू असते. सावली तालुक्याला जोडणारा हा रस्ता गावांसाठी मुख्य मार्ग असल्याने दुचाकी-चारचाकी या मार्गे जास्त प्रमाणात जात येत असतात. जिल्हा महामार्ग सोडले तर तालुक्यातील अनेक गावात रस्त्याचे खड्डेमय विकास पाहायला मिळतो. नूतनीकरण नाहीतर कमीत कमी खड्डे तरी बुजवावीत ही मागणी वाहन धारक करत आहेत. तयार झालेल्या रस्त्याची दुरुस्ती तर दूरच पण साधे खड्डे सुद्धा बुजवले जात नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य झाले असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उखडले असून दोन ते तीन फुटाचे पसरट खड्डे पडले आहेत. वाहन चालकास वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते आहे.  काही दिवसात पावसाची सुरवात होणार असुन वाहन धारकाना तारेवची कसरत करावी लागणार आहे तेव्हा प्रशासनाने नागरिकांची तालुका स्थळी येण्याकरिता होणारी फरपट थांबवावे अशी मागणी जोर धरत आहे.
पालकमंत्री यांनी सुद्धा सावली जिबगांव हरांबा मार्गाची डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन तिन ते चार महिण्यापुर्वी भुमीपुजन सोहळा जिबगांव येथे पार पडले पण रस्ता दुरुस्ती फक्त बोर्डावर दिसुन येत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन निदान डागडुजी तरी करावे व मार्ग सुरळीत करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here