धक्कादायक : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या

623

– सततच्या नापीकीने उचलले टोकाचे पाऊल 
The गडविश्व
सावली : तालुक्यातील हरांबा येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकी व विविध बॅंकेच्या कर्जामुळे नैराशेतू गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ओमदेव तिवाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक ओमदेव तिवाडे यांचे हरांबा शिवारात ८ एकर शेती आहे. त्यांच्याकडे मध्यवर्ती बँक व आय डी बी आय बँक येथील थकीत कर्ज आहे. IDBI बँक चे १,३३,००० व सेवा सहकारी सोसायटी २,००,००० व इतर खाजगी कर्ज मिळून जवळपास ५,००,००० रुपयाचे कर्ज डोक्यावर होते.
शेतात सतत नापिकी होत असल्याने कर्ज कसे फेडावे यात ते सतत विवंचनेत राहायचे. कुटुंबातील पाच ते सहा जणांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. तसेच २ मुलांना शिक्षण, शेतात उत्पन्न नाही, हातात काहीच नसल्याच्या आर्थिक विवंचनेत तिवाडे कुटुंब होते.
नापिकीने आर्थिक तंगी, कर्ज फेडीसाठी शेती जप्ती होईल या भीतीच्या विवंचनातून त्यांनी काल गुरुवारी टोकाचे पाऊल उचलत शेतातच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई बाबा आहेत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठवाडा व महाराष्ट्रच्या इतर भागातील शेतकरी आत्महत्येचे लोन आता धानपट्ट म्हणजेच पूर्व विदर्भात ही पसरल्याचे चिन्ह दिसून येत आहे. शासनाने तात्काळ तिवाडे कुटूंबियांना मदत करावी अशी गावकरी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here