– सध्या पोशाखात नक्षली असल्याची माहिती
The गडविश्व
बिजापूर : जिल्ह्यात नदीपुल बांधकामावरील एका अभियंत्याचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. इंद्रावती नदीवर पूल बांधण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या कामात एका खासगी बांधकाम कंपनीचा अभियंता मजूर लावत होता. दरम्यान, नदीपलीकडून अचानक नक्षली आले आणि त्यांनी अभियंत्याचे अपहरण केले. बिजापूर जिल्ह्याचे एएसपी पंकज शुक्ला यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळाली असून, पडताळणी सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंद्रावती नदीच्या दुसऱ्या टोकाला गावकऱ्यांच्या साध्या पोशाखात नक्षली आधीच अभियंत्याची वाट पाहत बसले होते. पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी काल शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे अभियंता अशोक पवार आले. दरम्यान, अचानक नक्षल्यांनी बंदुकीचा धाक दाखवून अभियंत्याला पळवून नेले. त्यानंतर कामगारांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी शिपाई मजुरांची विचारपूस करत आहेत. सध्या तरी या अभियंत्याची ओळख पटलेली नाही अशी माहिती कळते .
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)