गडचिरोली : शेतीच्या वादावरून जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप

253

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, २ मार्च : शेतीच्या वादावरून जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. समय्या अंकलु दुर्गम (४६) रा. रेगुंठा ता. सिरोंचा जि.गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक राजक्का व्यंकटी बोल्हे (५०) रा. रेगुंठा ता. सिरोंचा व तिचे दोन सुना हे ०३ नोव्हेंबर २०१९ रोजी आपल्या शेतात मुंग पेरणीचे काम करीत होते. दरम्यान आरोपी समय्या अंकलु दुर्गम व त्याची पत्नी लक्ष्मी अंकलु दुर्गम हे त्यांच्या शेतात कुऱ्हाड घेवुन आले व शेतजमिनीवरून वाद घातला. यावेळी समय्या दुर्गम हा राजक्का व्यंकटी बोल्हे हिच्या अंगावर धावुन येत कुन्हाडीने डोक्यावर, छातीवर वार करत हत्या केली. त्यावेळी फिर्यादी आपला जीव वाचविण्यासाठी गावाकडे पळत अली व सर्व हकिकत सासरे व्यंकटी बोल्हे यांना सांगीतली व पोलीस स्टेशन रेगुंठा येथे जावुन सदर घटनेबाबत रिपोर्ट दिली असता फिर्यादी सौ. राजेश्वरी सडवली बोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात उप पोस्टे गुंठा येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर प्रकारनाचा पोलीस यंत्रणेने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून गुरुवार २ मार्च २०१३ रोजी आरोपी समय्या अंकलु दुर्गम (४६) वर्ष, रा. रेगुंठा ता. सिरोंचा याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम ३०२ भादवी मध्ये जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोउपनि / बाळासाहेब बी. सुर्यवंशी उपपोस्टे रेगुंठा यांनी केला आहे. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.

(The gadvishva) (gadchiroli news updates) (The gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here