The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १६ : धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा जपत इयत्ता दहावीचा निकाल १००% लागवून सर्वांची मने जिंकली आहेत. यंदा इयत्ता दहावीमध्ये एकूण २७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली असून सर्वच विद्यार्थिनी उत्तम गुणांसह यशस्वी झाल्या आहेत.
या निकालात ७ विद्यार्थिनींनी प्राविण्य श्रेणीत, १९ विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणीत तर १ विद्यार्थिनीने द्वितीय श्रेणीत यश संपादन केले.
शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींमध्ये कु. जानवी गावडे हिने ८०.८०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. प्रतिमा कोरेटी हिने ८०.६०% गुणांसह द्वितीय तर कु. रक्षा सहारे हिने ७९% गुण मिळवत तृतीय क्रमांकावर आपले स्थान पक्के केले.
या यशस्वी निकालाबद्दल गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, मुख्याध्यापिका दीपाली कुळमेथे, गृहप्रमुख मृणाली राऊत, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यशामागील शिक्षकवृंदात कीर्ती फुंडे, सरिता वालकर, दुशीला उंदीरवाडे, सुलोचना गाडगे, कीर्ती उंदीरवाडे, प्रीती बोदलकर, मंजुषा कुथे, लक्ष्मी कुकुडकर, स्वीटी डोईजड, तसेच वाघाडे, बडोले, वालदे यांचे मोलाचे योगदान राहिले.
शाळेच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण धानोरा परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
