शेतावरून परत येत असतांना वाघाचा हल्ला : शेतमजुर ठार

2671

– वाघाचे इसमावरील हल्ल्याच्या घटनेत वाढ, हिरापूर शेतशिवरातील घटना
The गडविश्व
ता.प्र / सावली, ११ ऑगस्ट : शेतावरील काम पुर्ण करून परत येत असताना वाटेत बैल धुत असतान दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून शेतमजुरास ठार केल्याची घटना हिरापूर शेतशिवारात आज ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान घडली. भक्तदास श्रीरंग झरकर (३५) असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.
सावली तालुक्यातील हिरापूर येथील भक्तदास श्रीरंग झरकर, वसंत पिपळखेडे आणि रजत राउत हे तिन शेतमजुर सुरेश भिसे यांच्या शेतात रोजीने आवत्याला बाशी मारण्यासाठी गेले होते. बाशीचे काम पुर्ण झाल्यानंतर बैलाना चराईसाठी किसाननगर शेतशिवारा लगत असलेल्या कोंडेखल मायनर लोडी पुलाजवळ बैल चारत असताना दोन मोठे वाघ परिसरात दबा धरून बसलेले होते. परिणामी वाघ पाहुन बैल चवताळले त्यामुळे तिन्ही शेतकरी झुडपात लपुन बसले असताना, भक्तदास झरकर यांच्यावर वाघाने हल्ला करून फरफतत नेले, उर्वरित दोन्ही शेतमजुरांनी आरडाओरड केली असता वाघाने घटनास्थळावरून फळ काढला मात्र तोपर्यंत वाघाच्या हल्लात भक्तदास झरकर यांचा जिव गेला.
मृत्तकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. घटनास्थळावर सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजुरकर व वनविभागाचे कर्मचारी दाखल होवुन पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here