राजाराम येथील नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी

207

– जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टाकीचे भूमिपूजन
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचे पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली. सदर विहीर व टाकीचे भूमिपूजन आज जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
राजाराम येथे सात आठ वर्षापासून टाकी उपलब्ध असुन सुद्धा गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नव्हते, मात्र जि.प.अध्यक्ष यांच्याकडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागातून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन संपन्न झाली आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य, अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर, ग्राम पंचायत सदस्य नारायण कम्ब्गोनिवार, ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे, कु.प्रिया पोरतेट, अँड.एच.के.आकदर, माजी सरपंच सौ.जोतीताई जुमानके, माजी उपसरपंच संजय पोरतेट, खाँदलाचे माजी सरपंच सौ.शंकुतला कूळमेथे, दिपक अर्का, रमेश पोरतेट, सुरेश पेंदाम, नारायण चालुरकर, मनोज आकदर, नामदेव पेंदाम, माधव कूळमेथे, महेश्वरी बत्तूलवार, मारोती पोरतेट, अरविंद परकीवार, प्रवीण पेंदाम, तिरुपती दुर्गे व गावातील महिला व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here