– अतिवृष्टीमुळे रस्ता गेला वाहून
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २१ सप्टेंबर : जिल्हा परिषद क्षेत्र रांगी – येरकड अंतर्गत येणाऱ्या निमगाव ते बोरी रस्त्यावरती भला मोठा खड्डा पडलेला असून यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्ताच वाहुन गेल्याने कोणते ही चारचाकी वाहन या ठिकाणावरून जावूच शकत नाही तरी पण दुचाकी स्वारांना मार्गावर प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
धानोरा तालुक्यातील निमगाव पासुन ५०० मिटर अंतरावर बोरी मार्गावर गावाला लागुणच तलाव आहे. जंगलातुन येणारे पाणी तलावात खालच्या भागाला उतरते परंतु पाणी जाण्याकरिता मोरीबांधका किवा पाईप टाकणे आवश्यक होते. मोरी बांधकाम न केल्याने पाण्याच्या प्रवाहात रस्ता वाहून गेला आहे. पाण्याचा प्रवाहाचा अधिक जोर असल्याने रस्त्यावरील गिट्टी आणि डांबर उखळून रस्ताच वाहून गेला. रस्त्यावर मोठा भगदाड पडल्याने या मार्गावररील रहदारी बंद पडलेली आहे. पडलेल्या खड्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिवित हानी होवून वाहनाचे मोठे नुकसान होवु शकते. अतिवृष्टीच्या पाण्याने मूळ रस्ताच खोदून नेल्याने जवळपास सध्या तरी हा रस्ता निकामी झालेला आहे.
परतीच्या पावसाने रस्त्याची क्षमता अधिकच खालावली गेली आहे. हल्ली रस्त्याची अवस्था बघितली असता रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे बाहेर पडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी रस्त्यावर वाहतूक किंवा प्रवास करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खोलवर पडलेल्या खड्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने मोठा अपघात टाळण्यासाठी वेळीच कारवाई करुन रस्ता सुरळीत करण्यात यावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन रस्ता वेळीच दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)