जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची ट्रक वाहून गेलेल्या घटनास्थळी धाव

648

– पेरमिली नाल्यावरुन ट्रॅक वाहून गेला, तिघांचा मृत्यू
The गडविश्व
अहेरी, १० जुलै : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील पेरमिली नाल्यावरून ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज १० जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेबाबत माहिती मिळताच जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी धाव घेतली.
मृतकांमध्ये अहेरी तालुक्यातील कसमपल्ली येथील सीताराम बिचू तलांडी, पत्नी समी सीताराम तलांडी असल्याचे समजते तर दुसरी पुष्पां नामदेव गावडे , रा.माकेला ता. भामरागड येथील असल्याचे समजते.जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. भामरागड मार्गावरील पेरमिली जवळ असलेल्या नाल्यावर ५ ते ६ प्रवासी असणारा ट्रक काल ९ जुलै रोजी रात्रो ९.३० ते १० वाजताच्या सुमारास नाल्यावरून वाहून गेल्याची माहिती रात्रो उशिरा माहिती प्राप्त झाली तर आज १० जुलै रोजी सकाळच्या सुमारास अहेरीचे तहसीलदार ओंतारी, जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच SDRF पथक व महसूल कर्मचारी यांनी शोधमोहीम राबविली असता ट्रक मध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे शवविच्छेदन करण्याकरिता दाखल करण्यात आले.
घटनास्थळी तहसीलदार ओंतारी, जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, पेरमिलीचे सरपंचा सौ.किरणताई कोरेत, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार व एसडीआरएफ चे व महसूस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here