रानभाज्यांसाठी जीव धोक्यात नका घालू

299

– वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांचे नागरिकांना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : पावसाळा सुरू होताच गडचिरोली जिल्ह्यात रानभाज्यांचा सिझन रंगात आलेला असताना, या भाज्यांच्या मोहात नागरिकांनी जीव धोक्यात घालू नये, असा स्पष्ट इशारा वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी दिला आहे.
सध्या डुंबरसात्या, शेरडीरे, पिंपळचा बार यांसारख्या रानभाज्यांसाठी नागरिक पहाटेच्या अंधारात जंगलात प्रवेश करत आहेत. परंतु, पावसाळ्यात जंगल निसर्गाने व्यापलेले असल्यामुळे झाडांच्या आड लपलेले हत्ती, बिबटे व इतर हिंसक वन्यप्राणी नजरेस न पडता थेट हल्ला करण्याची शक्यता वाढते.
विशेषतः चूरचुरा, नवरगाव आणि देलोडा परिसरात हत्तींचा कळप फिरत असल्याने त्या भागात नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुकडकर म्हणाले की, “मोलाच्या दोन पैशांसाठी आपण स्वतःचा जीव धोक्यात घालणे बुद्धिमत्तेचे नाही. रानभाज्या जरूर महत्वाच्या आहेत, पण त्या गोळा करताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.”
गावातील अनेक महिला व पुरुष याच रानभाज्यांच्या विक्रीसाठी जंगलात जात असल्याचे दिसते, मात्र वन्यजीव हल्ल्याच्या घटनांनी या मोहाची किंमत जीवावर बेतू शकते. त्यामुळे ग्रामस्थांनी अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #गडचिरोली #रानभाज्या #हत्तीहल्ला #वनसुरक्षा #AjayKukadkar #ForestAlert #WildlifeSafety

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here